text
stringlengths 0
147
|
---|
ऐसे सहसा करू नये । दोघां भांडण तिसऱ्या जाय। |
धीर करोन महत्कार्य । समजोन करावे ।। |
राजी राखता जग । मग कार्यची लगबग। |
<<< |
ऐसी जाणोनी सांग । समाधाने करावी ।। |
आरंभीच धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती । |
याकारणे समस्ती । बुद्धी शोधावी ।। |
सकळ लोक येक करावे । गनिमा निपटुनी |
येणे करिता कीर्ति धावे । दिगंतरी ।। |
आधी गाजवावे तडाखे । तरी मग भूमंडळ धाके। |
पैसे न होता धके । राज्यास होती ।। |
समय प्रसंग वोळखावा । राग निपटुनी । |
आला तरीं कळो न द्यावा । जनामाजी |
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे येक । |
लोकांचे मनामध्ये धाक । उपजोची नयें ।। |
बहुत लोक मेळवावे । येक विचारे भरावे । |
कष्ट करोनी घसरावे । म्लेंच्छांवरी ।। |
आहे तितके जतन करावे। पुढे आणिकही मेळवावे |
मऱ्हाष्ट्र राज्य करावे । जिकडे ।। |
लोके हिंमती धरावी । शर्थीची तरवार करावी |
पदवी । पावाल येणे ।। |
शिवराजांस आठवावे । जिवीत तृणवत मानावे । |
इहलोकी-परलोकी रहावे। कीर्तिरूपें ॥। |
शिवराजाचे आठवावे रूप । शिवराजाचा आठवावा प्रताप । |
शिवराजाचा आठवावा साक्षेप । या भूमंडळी |
शिवराजाचे कैसे बोलणे । शिवराजाचे कैसे चालणे । |
शिवराजाची सलगी देणे । कैसी असे ।। |
सकळ सुखाचा त्याग । करूनी साधीजे तो योग । |
राज्यसाधनेची लगबग । कैसी केली ।। |
त्याहून करावे विशेष । तरीच म्हणवावे पुरुष । |
याउपरी आता विशेष । काय लिहावे? ।। |
श्री समर्थांचा हा उपदेश म्हणजे अंधारात चाचपडणाऱ्या संभाजी राजांकरता नंदादीपच |
होता. त्यांनी पूर्वीचे सर्व राग-लोभ विसरून आपल्या विरोधातील दस्त केलेल्या असामींना |
कैदेतून मोकळे केले. 'मागील अपराध क्षमा' करून कारभाऱ्यांनाही 'हाती धरीले'. परंतु |
दि. १२ ऑक्टोबर १६८०, अश्विन शु. १, स्वराज्याचे पंतप्रधान मोरेश्वर त्रिंबक पिंगळे |
वारले. त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचे करून, संभाजीराजांनी त्यांना पेशवेपद दिले. |
निळोपंत हे आता स्वराज्याचे पेशवे बनले. |
माघ शु. ७, दि. १४ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांनी |
राज्याभिषेक करून घेतला. यानंतर सर्व कारभार सुरळीत सुरू झाला. हे पाहून अन् आपली |
<<< |
सारी राजकारणे धुळीस मिळालेली बघून सोयराबाईंनी विष प्राशन करून |
आत्महत्या केली. सोयराबाईंच्या या आत्मघातकी कृत्याच्या धक्क्यातून रायगड बाहेर |
न तोच एक भयंकर बातमी रायगडावर येऊन धडकली. दि. १३ नोव्हेंबर १६८१ रोजी |
खासा औरंगजेब तीन लाख शाही फौजेनिशी बऱ्हाणपुरात येऊन दाखल झाला होता. |
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर केव्हा ना केव्हा तरी ही परिस्थिती उद्भवणार |
होतीच. संभाजीराजे मोगलाईतून पुन्हा स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना |
अखेरचे समजावले होते. खासा औरंगजेब दख्खनेत उतरणार हे महाराजांना ठाऊक |
असल्यानेच प्रथम त्यांनी 'दक्षिणी पंथाची एकजूट' करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले |
होते. संभाजी महाराजांची आता खरी कसोटी होती. परंतु, या काळात शिवाजी महाराज, |
जिजाऊ साहेबांच्या अधिकाराने उपदेश करणारं असं कोण होतं? होते ना! श्री समर्थ |
रामदास स्वामी. परंतु दैवगतीही अशी विचित्र की या महाप्रलयाच्या सुरुवातीसच दि. २२ |
जानेवारी १६८२, माघ वद्य. ९ या दिवशी समर्थांनी सज्जनगडावर जिवंतपणी समाधी |
घेतली. आता मात्र संभाजी महाराज एकटे पडले अगदी खऱ्या अर्थाने एकाकी पडले! |
दि. १८ १६८२ या दिवशी गांगोली या गावात शंभूराजांच्या आणि |
येसूबाईंच्या प्रथम पुत्राचा जन्म झाला. आपल्या थोर पित्याच्या स्मरणार्थ संभाजीराजांनी |
पुत्राचे नाव ठेवले 'शिवाजी राजे' (हेच पुढे शाहूराजे म्हणून प्रसिद्ध). |
दि. १४ एप्रिल १६८५ या दिवशी विजापूरला मोंगली फौजांचा वेढा पडला. रहिमतखान, |
रूहुल्लाखान, रणमस्तखान अशा शाही सरदारांनी विजापूरला मोर्चे लावले. वास्तविक |
आदिलशाही आणि कुतुबशाही या 'इस्लामी शाह्या' होत्या. तरीही त्या 'दख्खनी' असल्याने, |
अन् मुख्य म्हणजे मराठ्यांना साहाय्य करत असल्याने औरंगजेबाने आपला रोख आता |
आधी या दोघांकडे वळवला. दि. ११ ऑक्टोबर १६८५ रोजी बादशहाजादा मुअज्जम याने |
थेट भागानगरवरच हल्ला चढवला. खुद्द बादशहा अबुल हसन कुत्बशहा भागानगरात होता. |
औरंगजेबाने बादशहाची बेगम सरिमाजानी हिला 'मजहब' च्या नावाखाली चिथावले आणि |
मादण्णापंत या काफीर पंडिताला दूर करण्याच्या कानपिचक्या दिल्या. या मूर्ख बेगमेने |
तिच्या खास खोजामार्फत भागानगरच्या चौकात सर्वांदेखतच मादण्णापंत आणि आकण्णा |
यांचे खून करवले. असे केल्याने मोंगल मागे हटतील अशी तिला अपेक्षा होती. परंतु हे दोन |
हुशार पंडित कायमचे दूर झालेले पाहताच मुअज्जमने अधिक जोर केला. शेवटी एक कोट |
रु. देण्याच्या बदल्यात (बापाशी गद्दारी करून) मुअज्जमने भागानगरचा वेढा उठवला. |
दि. १३ सप्टेंबर १६८६ या दिवशी विजापुरी फौजेने हत्यार खाली ठेवले. मोंगली |
फौजांनी विजापूर ताब्यात घेतले. खासा सुलतान सिकंदर आदिलशहा कैद झाला. इकडे |
मुअज्जमने भागानगरचा वेढा उठवल्याचे कळताच औरंगजेबाने त्याची चांगलीच खरडपट्टी |
काढली आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय, विजापूर जिंकल्यानंतर केवळ एका |
वर्षातच दि. २७ सप्टेंबर १६८७ या दिवशी शाही फौजांनी भागानगरही जिंकले. खासा |
कुतुबशहा- अबुल हसन तानाशाह कैद झाला. विजापूरचा सिकंदर आदिलशहा आणि |
भागानगरचा तानाशाह कुतुबशहा या दोन्ही शाही कैद्यांना प्रथम अहमदनगरच्या किल्ल्यात |
<<< |
अन् नंतर दौलताबादेवर कैदेत ठेवण्याचा हुकूम झाला आणि आता मोंगली फौजांचा संपूर्ण |
रोख वळला महाराष्ट्राकडे ... मराठ्यांकडे !! |
भागानगर आणि विजापूरचा पाडाव केल्यानंतर औरंगजेब आता आपलं लक्ष पूर्णतः |
महाराष्ट्राकडे वळवणार हे तर उघडच होतं. अन् म्हणूनच तो महाराष्ट्राच्या वाटेवर असतानाच |
त्याचे खच्चीकरण करण्यासाठी मराठे त्याच्या फौजेवर एकदम हल्ला अन् |
करत मागच्या मागे पसार होत. परंतु, अशाच एका छाप्याच्या वेळी वाईजवळ |
मोंगल अन् मराठ्यांच्यात चकमक सुरू असतानाच मोंगलांच्या एका जंबुरीयाचा (लहान |
तोफेचा) तापलेला गोळा थेट सरसेनापतींच्या, हंबीरराव मोहित्यांच्या छाताडावरच येऊन |
आदळला. हंबीरराव जागच्या जागी गतप्राण झाले. हंबीररावांच्या मृत्यूने संभाजीराजांना फार |
मोठा धक्का बसला. परंतु, आता शोक करत बसून चालणार नव्हते. राजांनी ताबडतोब |
पन्हाळ्याचे किल्लेदार म्हलोजी घोरपडे यांना स्वराज्याची सरनौबती दिली. महाराष्ट्रात |
आल्यावर औरंगजेबाचा शाही डेरा पडला अकलूजला !! |
औरंगजेब दख्खनेत विजापूर अन् भागानगरच्या मोहिमेवर गुंतला होता, त्या वेळेस |
संभाजीराजेही गप्प बसले नव्हते. त्यांनी जंजिरा स्वराज्यात आणण्याची फार खटपट केली. |
जंजिरा येत नाही हे पाहताच संभाजीराजांनी अक्षरशः खाडीत भराव घालून तो घेण्याचा |
प्रयत्न केला. परंतु, औरंगजेबाच्या आक्रमणाने ती मोहीम फसली. यानंतर संभाजीराजांनी |
गोमांतकावर स्वारी केली. गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर तर अत्यंत घाबरला होता. त्याने गलबते |
तयार ठेवून पोर्तुगालला जाण्याची तयारी ठेवलीच होती. परंतु, या मोहिमेतही संभाजीराजांना |
यशाने थोडक्यासाठी गुंगारा दिला. |
औरंगजेबाचा अकलूजला तळ पडताच त्याने आपला सरदार आणि वजीर |
जाफरखानाचा मुलगा एतिकादखान याला रायगडावर हल्ला करायला पाठवले. अर्थात |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.