text
stringlengths
0
147
राहून राज्यकारभार सांभाळावा युवराजांचे प्रमुख कर्तव्य असते. परंतु, संभाजीराजांच्या
उतावळ्या अन् अविवेकी स्वभावामुळे त्यांचे सरकारकूनांशी पटत नसे. अशातच
राज्याभिषेकानंतर सोयराबाईंची सातमहालातून अनेक 'जनानी राजकारणे' सुरू
असल्यामुळेच असेल बहुदा पण युवराज संभाजीराजे शृंगारपुरात येऊन स्थायिक झाले.
संभाजीराजे हे संस्कृत पंडित अन् उत्तम कवीही असल्याने त्यांचे मन या ठिकाणी रमणे
स्वाभाविकच होते. संभाजीराजांच्या सेवेत केशव पंडित, उमाजी पंडित, कवी कलश
यांसारखे संस्कृत पंडित सतत हजर होते. दिवस जात होते. शृंगारपूरच्या मुक्कामी
संभाजीराजांनी 'नायिकाभेद' हे अष्टनायिकांचे स्वभाव-भेद सांगणारं हिंदी काव्य आणि
'बुधभुषणम्' या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केली. येथून जवळच शिर्क्यांचा होता. शिर्के
म्हणजे शंभूराजांचं सासर!
दिवस जात होते. दि. ४ सप्टेंबर १६७७ या दिवशी संभाजीराजांना येसूबाईसाहेबांच्या
पोटी कन्यारत्न झाले. या कन्येचे नाव ठेवण्यात आले 'भवानी'. मधल्या काळात अनेक
लहान-मोठ्या कारणांवरून सरकारकून आणि युवराजांच्यातला वाद अत्यंत विकोपाला गेला
होता. शिवाजी महाराज रायगडावर आले अन् त्यांना या साऱ्या घटना समजल्या.
महाराजांना युवराजांबद्दल काळजी वाटू लागली होती. त्यांनी युवराजांना एखाद्या पवित्र
वातावरणात, साधूंच्या, संतांच्या सहवासात ठेवावे असा विचार केला आणि
त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवून आज्ञा केली, 'आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या
सहवासात राहण्यास सज्जनगड़ी जावे. त्यांचा उपदेश घ्यावा.' अन् मनातून रूष्ट झालेले
संभाजीराजे नाईलाजानेच डिसेंबर १६७८ मध्ये दाखल झाले.
संभाजीराजे सज्जनगडावर आले तेव्हा समर्थ तेथे नव्हते. युवराजांच्या मनाची घालमेल
अधिकच वाढली. 'आतापर्यंत सरकारकून आणि सोयराबाईच विरोधात होत्या. परंतु, आता
आबासाहेब शिवछत्रपतींना देखील आपण 'बिघडलो' असे वाटू लागले आणि म्हणूनच
त्यांनी आपल्याला सज्जनगडावर पाठवले' या एकाच विचाराने युवराजांना हैराण केले
आणि अखेर दि. १३ डिसेंबर १६७८ या दिवशी युवराज संभाजीराजे मोगलांचा सरलष्कर,
सालार-ए-दख्खन दिलेरखान पठाणाकडे जाऊन मिळाले !!
युवराज मनात बंडाची भावना घेऊन दिलेरकडे गेले नव्हते. त्यात आपणही पराक्रमी
आहोत हे शिवाजी महाराज आणि इतर कारकुनांना दाखवून देण्याची भावना होती.
परंतु युवराजांच्या या भाबडेपणाचा फायदा दिलेरखान घेतल्याशिवाय कसा राहील? त्याने
संभाजीराजांना पुढे करून महाराजांचा साताऱ्याजवळचा 'भूपाळगड' हा किल्ला घेतला.
यानंतर दिलेरने फौजेचा मोहरा वळवला दार-उस-सल्तनत विजापूरकडे! विजापूरचा पूर्वीचा
<<<
वजीर पठाण बहलोलखान हा दि. २३ डिसेंबर १६७७ रोजी मरण पावला होता. त्यामुळे
आता 'सिद्दी मसूद' हा आदिलशहाचा वजीर होता. याच मसूदने (जौहरचा जावई) पूर्वी
महाराजांना विशाळगडच्या वाटेवर पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. परंतु आता हाच
मसूद दिलेरला प्रचंड घाबरला अन् त्याने शिवाजी महाराजांना मदतीची साद घातली.
आदिलशहाने महाराजांनी आजपर्यंत घेतलेल्या शाही मुलखाला 'अधिकृत' परवानगीच
देऊन टाकली. महाराजांच्या 'दक्षिणी पंथाच्या एकजुटीतला' दुसरा महत्त्वाचा दुवादेखील
आज साध्य झाला. महाराजांनी आदिलशहाला निर्धास्त राहायला सांगितले आणि त्यांनी
गनिमीकाव्याने दिलेरची अक्षरशः लांडगेतोड सुरू केली. शेवटी विजापूरचा नाद सोडून दि.
१४ नोव्हेंबर १६७९ रोजी दिलेरच्या फौजा तिकोट्याच्या रोखाने वळल्या.
तिकोट्यात आल्यानंतर तेथील हिंदू प्रजेचे दिलेरने अत्यंत हाल सुरू केले. हे सहन न
झाल्यानेच संभाजीराजांचे दिलेरशी अत्यंत कटू खटके अन् संभाजीराजांना आपली
चूक कळून आली. अशातच औरंगजेबाचा 'संभाजीला कैद करून दिल्लीस पाठवा' या
आशयाचा गुप्त खलिता दिलेरला मिळाल्याच्या बातम्या संभाजी महाराजांना समजल्या.
आता मात्र संभाजीराजांचे डोळे उघडले आणि अखेर दि. २० नोव्हेंबर १६७९ या
दिवशी संभाजीराजे मोंगल छावणीतून पळाले आणि थेट विजापूर गाठले आणि तेथून दि. ४
डिसेंबर १६७९ रोजी स्वराज्यात पन्हाळगडावर येऊन दाखल झाले.
महाराजांनीही मग मोठ्या उदारमनाने आपल्या पुत्राला मायेने पोटाशी धरले आणि
समजावले. संभाजीराजांनीही मोठ्या मनाच्या समजुतीने महाराजांना म्हटले,
'आपणास साहेबांच्या पायाची जोड आहे. आपण दूधभात खाऊन साहेबांचे (शिवाजी
महाराजांच्या) पायाचे चिंतन करून राहीन.' यानंतर महाराजांनी युवराजांना पुन्हा
अधिकारात घेऊन पन्हाळा प्रांतावर नेमले आणि महाराज परतले.
महाराज रायगडावर आल्यानंतर राजाराम महाराजांची मुंज अन् लग्न उरकण्याचा त्यांनी
निश्चय केला. दि. १५ मार्च १६८० या दिवशी राजारामांचे लग्न सरसेनापती कै. प्रतापराव
गुजर यांची कन्या जानकीबाई हिच्याशी लावून देण्यात आले.
दि. २० मार्च १६८० या दिवशी सूर्यग्रहण होते. महाराजांचे मन आणि शरीर आधीच
थकले होते. अशातच महाराज कदाचित ग्रहणकाळात करण्यात येणारे स्नानविधी करण्यास
गंगासागराच्या थंड पाण्यात उतरले असावेत. कारण ग्रहणानंतर दोन दिवसातच महाराजांना
प्रचंड ताप भरला. दिवसेंदिवस ताप वाढतच चालला होता.
- आणि चैत्र शुद्ध पौर्णिमा (हनुमान जयंती), दि. ३ एप्रिल १६८० चा दिवस उजाडला.
महाराजांनी साऱ्या सवंगड्यांना जवळ बोलवून आपल्या मागे राज्य कसे सांभाळावे ते
सांगितले. सर्व जण अत्यंत दुःखी होते. महाराज अत्यंत शांतपणे म्हणाले,
"आपली आयुष्याची अवधी झाली. आपण आता कैलासास श्रींचे दर्शनास जाणार!"
यानंतर महाराजांनी शेवटची निरवानिरव केली. सर्वांना बाहेर बसण्यास सांगितले.
- आणि भर मध्यान्ही आवस झाली. दुपारी बाराच्या सुमारास महाराजांनी हे जग सोडले.
<<<
महाराष्ट्र पोरका झाला.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यकारभार कोणी पहावा हा प्रश्न साहजिकच उभा
राहिला. अर्थात परंपरा आणि रितीनुसार ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांना अभिषेक करणे उचित
होते. परंतु, संभाजीराजांच्या स्वभावाची सर्वांनाच धास्त वाटत होती. नुकतंच हे दिलेरखान
प्रकरण झाल्यामुळे तर त्यांना कारभार देणे हे बहुतेकांना धोक्याचं वाटत असावं. अशातच
सोयराबाईंच्या मदतीने शेवटी मोरोपंत पिंगळे पंतप्रधान आणि अण्णाजी दत्तोपंत सचिव
यांनी वैशाख शु.३, दि. २१ एप्रिल १६८० रोजी राजारामांना मंचकावर बसवले (राज्याभिषेक
केला नाही!). याचवेळी मोरोपंत आणि अण्णाजी यांनी संभाजीराजे पुन्हा बंड करू नये
म्हणून त्यांना पकडण्यासाठी पन्हाळगड़ाकडे सैन्यासह कूच केले. स्वराज्याचे सरसेनापती
हंबीरराव मोहिते हे मात्र प्रथमपासूनच संभाजीराजांच्या पक्षात होते. ते सरसेनापती
असल्याने फौजेचे वळणही युवराजांकडेच होते. पंत पेशवे आणि सचिव पन्हाळ्याच्या
वाटेवर असतानाच कराड प्रांतात तळबीडजवळ हंबीररावांनी दोघांनाही कैद केले.
संभाजीराजांचे बळ होते.
दि. २६ जून १६८० रोजी संभाजीराजांनी येसाजी कंक आणि रायगडचा किल्लेदार
चांगोजी काटकर यांच्या मदतीने रायगड आपल्या ताब्यात घेतला आणि कारभार सुरू केला.
वास्तविक पाहता शिवाजी महाराजांनी शेवटच्या क्षणी आपल्या पुत्राला क्षमाच केली होती.
तरीही बहुतेकांच्या मनात अजूनही संदेह होताच. कारभार सुरू झाल्यानंतर श्री
समर्थ रामदासस्वामी यांनी शंभूराजांना त्यांच्या थोर पित्याची आठवण करून देत
राज्यकारभार नेमका कसा करावा याकरिता एक विस्तृत पत्रच पाठवले. ते पत्र असे -
अखंड सावधान असावे । दुश्चित कदापि नसावे ।
तजवीज करीत बैसावे । येकांत स्थळी ।।
काही उग्रस्थिति सांडावी । काही सौम्यता धरावी।
चिंता पराची लागावी । अंतर्यामी ।।
मागील अपराध क्षमा करावे। कारभारी हाती धरावे।
सुखी करुन कामाकडे ।।
पाटातील तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।
तैसे जनांच्या मना । कळले पाहिजे ।।
जनांचा प्रवाह चालीला । म्हणजे कार्यभाग आटोपला ।
जन ठायी ठायी तुंबला । म्हणीजे ते खोटे ।।
श्रेष्ठी जे जे मेळविले । त्यासाठी भांडत बैसले।
तरी मग जाणावे, फावले । गनिमासी ।।