text
stringlengths 0
147
|
---|
राज्यकर्ते (पेशवे) त्यांचे साहाय्यक हे सर्व अत्यंत नालायक होते असं रंगवणं जेत्यांना |
(इंग्रजांना) क्रमप्राप्तच होतं. ते त्यांनी अगदी मनापासून केलं ... पेशवाई नष्ट झाल्यावर |
पेशव्यांचा प्रचंड दफ्तरखाना आणि निरनिराळ्या सरदारांची-जहागिरदारांची दफ्तरं |
एलफिन्स्टन आणि ग्रँट या जोडगोळीच्या हातात अनायासेच पडली. त्यांनी ती किती |
साफसूफ करून ठेवली असतील हे आता कल्पनेवरच सोपवलं पाहिजे. याला आणखी एक |
कारण आहे. परवापरवापर्यंत मोठ्या दिमाखानं उभं असलेलं मराठी राज्य अकस्मात लयाला |
गेल्यामुळे मराठी मनात विस्मययुक्त संताप दाटला होता. उघडपणे त्याचं खापर इंग्रजांच्या |
डोक्यावर फोडता येत नव्हतं. त्याचमुळे नकळत आम्ही आमच्याच लोकांना दोषी धरून |
<<< |
त्यांच्याबद्दल आमचा संताप व्यक्त करू लागलो. अशा संतापाचा सर्वात मोठा बळी दुसरा |
बाजीराव पेशवा ... " इनामदारांनी मांडलेली ही गोष्ट अत्यंत खरी आहे. सामान्य जनतेने |
पेशवाई बुडाल्याचा संताप आणि इंग्रजांविरुद्ध बोलण्याची भीती यामुळे बाजीरावांनाच दोषी |
धरलं. परंतु 'लोकहितवादी' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोपाळ हरी देशमुखांनीही सत्य न |
तपासता पेशव्यांनाच शिव्या द्याव्यात ही अत्यंत गोष्ट होती. वास्तविक या |
लोकहितवादींचे वडील सरदार बापू गोखल्यांचे 'फडणीस' होते. गोपाळ अष्टीच्या लढाईत |
बापू पडले. देशमुखांचेही कुटुंब उघड्यावर आले. परंतु, माल्कमला शरण आल्यानंतर |
'आपल्या व आपल्या सरदारांच्या सरंजामांची योग्य सोय इंग्रजांनी लावावी' अशा |
बाजीरावांच्याच अटीमुळे माल्कमनेही ती सोय विनातक्रार लावली. यातच काही काळात |
हरिपंत देशमुखांचं निधन झालं आणि त्यांचा ज्येष्ठ पुत्र गोपाळराव याला इंग्रजी भाषेचं उत्तम |
ज्ञान असल्याने एलफिन्स्टनने आपल्या कचेरीत नोकरी दिली. इ. स. १८४२ मध्ये वयाच्या |
एकोणिसाव्या वर्षी गोपाळराव नोकरीला लागले. इ. स. १८४८ पासून त्यांच्या विचारांची |
'शतपत्र' निघण्यास सुरुवात झाली. या शतपत्रांत बालविवाह, विधवा विवाह, जुन्या अनिष्ट |
चालीरिती यांबाबत टीका असली तरी टीकेचा मुख्य विषय होता 'ब्राह्मण आणि त्यांचा |
मूर्खपणा'. लोकहीतवादींनी आपले विचार लोकांच्या गळी उतरवले. एका पत्रात ते म्हणतात |
की, 'फक्त भट आणि लोकच बाजीरावाची स्तुती करतात.' लोकहितवादींचा जन्म |
आहे १८२३ सालचा. त्यांची शतपत्र निघायला लागली तेव्हा त्यांचं वय जवळपास पंचवीस |
वर्षे होतं. अन् यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर, १८५१ साली दुसऱ्या बाजीरावांचा मृत्यू झाला. |
मग इकडे एलफिन्स्टनच्या कचेरीतील सुरक्षा बाजूला सारून ब्रह्मावर्तावर जाऊन |
बाजीरावांना त्यांच्या चुकांबद्दल जाब विचारण्याचं धाडस लोकहितवादींनी दाखवलं नाही. |
ब्रिटिश रेसिडेन्सीच्या भिंतीं आडून बाजीरावांना शिव्या देणं तसं फारसं 'धोकादायक' नव्हतं |
हेच यामागचं कारण असावं बहुदा !! लोकहितवादी म्हणत की, पेशवाईत फक्त ब्राह्मणांचीच |
चलती होती. परंतु 'अत्यंत नालायक' म्हणून हिणवलं गेलेल्या दुसऱ्या बाजीरावांच्या |
काळातही जे सरंजाम दिलेत ते पाहण्यासारखे आहेत. त्यात नवीन पागा ज्यांना दिल्या |
आहेत असे केवळ तीन ब्राह्मण आणि चोवीस अब्राह्मण आहेत. याच्यात एका महाराचं अन् |
एका मुसलमानाचंही नाव आहे. गाड़दी बाळगण्याचा अधिकार तीन ब्राह्मण आणि तीन |
अब्राह्मणांना दिला आहे. ही माहिती तपासूनही नजरेआड केली असल्यास त्यात शंका |
नाही !!! |
त्रिंबकजी डेंगळे या माणसाविषयीही अनेक पूर्वग्रह आहेत. हा माणूस बाजीरावाचा |
खुषमस्कऱ्या होता, एलफिन्स्टनचा हेर होता, त्याने बाजीरावाला अनभिज्ञ ठेवून कारभार |
'कब्जात' घेतला असे अनेक आक्षेप त्यांच्याबद्दल आहेत. परंतु मूळ साधनांच्या |
माहितीवरून त्यांची तुलना केवळ नाना फडणवीसांसारख्या बृहस्पतीशीच करता येऊ |
शकते. एकीकडे त्रिंबकजीकडे असे आरोप होत होते. परंतु दुसरी गोष्ट कोणी मानायलाच |
तयार नव्हतं. प्रकरणात हस्तक्षेप करून त्रिंबकजींनी एलफिन्स्टनला |
पहिल्यांदा अडचणीत आणलं. हे प्रकरण जाणार असं वाटत असतानाच त्रिंबकजींनी |
<<< |
इंग्रजांविरुद्ध मोठंच राजकारण आरंभलं. नेपाळच्या राजाने इंग्रजांचा प्रचंड पराभव केला |
होता. याचाच आधार घेऊन त्रिंबकजींनी, पूर्वी नाना जशी चौकड़ी उभी केली |
तसं करायचं ठरवलं. पूर्वेकडून ब्रह्मदेशच्या राजाने, उत्तरेकडून नेपाळच्या राजाने, |
पश्चिमेकडून पंजाबच्या शीख रणजितसिंह यांनी आणि दक्षिणेकडून पेशवे आणि त्यांच्या |
सरदारांनी एकदम इंग्रजांवर हल्ला अशी त्रिंबकजींची योजना होती. परंतु, दुर्दैवाने |
ब्रह्मदेशच्या राजाने आणि इंग्रजांशी स्वतंत्र तह केलेल्या मराठी सरदारांनी या योजनेला |
प्रतिसाद न दिल्याने ही योजना बारगळली अन् अपयश मात्र त्रिंबकजींच्या पदरी पडले. |
अर्थात बाळाजीपंत नातूंसारखे इंग्रजांनी फेकलेले तुकडे चघळणारे अनेक फितूर |
आपल्याकडे असल्याने त्रिंबकजींच्या या गुप्त राजकारणाचा सुगावा एलफिन्स्टनला लागला |
आणि त्रिंबकजींपासून असणारा धोका ओळखून त्यांना गंगाधरपंत शास्त्रांच्या खुनाच्या |
प्रकरणात अडकवण्यात आले. एलफिन्स्टनने गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जला स्पष्ट लिहिलं |
होतं की, "पेशवाईचा खरा सूत्रधार बाजीराव नसून त्रिंबकजीच आहे. त्याला कारभारातून दूर |
केल्याशिवाय आपल्याला काहीही करता यायचं नाही ... " या साऱ्या गोष्टींवरूनच |
त्रिंबकजींची हुशारी अन् त्यांचे महत्त्व लक्षात येते आणि बाजीरावांनी सारा कारभार त्यांच्या |
हातात का दिला हेही स्पष्ट होते. |
बाजीरावांविषयीचा आणखी एक आक्षेप म्हणजे ते स्त्री-लंपट होते. त्यांची अकरा लग्नं |
झालेली होती, ते कायम बायकांच्याच घोळक्यात असायचे इ. अनेक! मुळातच मराठी |
राज्यकर्त्यांचं बहुभार्या असण्याचं कारण हे एकपत्नी व्यवस्था असणाऱ्या इंग्रजांना |
मानवणारं नव्हतं. परंतु अगदी भगवान श्रीकृष्णापासून आपल्याकडे बहुभार्या पद्धत |
अस्तित्वात आहे. खुद्द शहाजीराजांची तीन लग्नं झालेली हे तर सर्वज्ञात आहेत. श्री थोरल्या |
राजारामांनाही जानकीबाई, ताराबाई आणि राजसबाई अशा तीन पत्नी होत्या. थोरल्या |
शाहूमहाराजांनाही अंबिकाबाई, सावित्रीबाई, सकवारबाई, सगुणाबाई अशा चार राण्या |
याशिवाय विरूबाई नावाची रक्षा होती. याशिवाय लक्ष्मीबाई आणि सखुबाई या नाटकशाळा |
होत्या. त्यामुळे एलफिन्स्टनसारख्या इंग्रजाचं ठीक आहे, परंतु वरील उदाहरणे ज्ञात |
असणाऱ्या मराठी माणसांनीही बाजीरावांना शिव्या द्याव्यात? मग बाजीरावांना एक न्याय |
आणि वरील माणसांना दुसरा हे कसे? काही इतिहासकार शाहिरांच्या पोवाड्यातील |
कथानकावरून बाजीराव पेशव्यांना स्त्रीलंपट म्हणतात. उदा .- 'कृष्णदास' नावाच्या एका |
शाहिराने रचला आहे. या पोवाड्यात तो म्हणतो- |
"बाजीराव महाराज अर्जी ऐकितो बायकांची, |
चल गडे, जाऊ पुण्याशी, हौस मोठी माझ्या मनाची ... |
हा सर्वस्वी देह केला अर्पण करुनी आण तुमची, |
शुक्रवार पेठेत बसूनी हाजिरी घेतो बायकांची ... " |
शिदरामा नावाचा एक शाहीर म्हणतो- |
"गेले बाजीराव श्रीमंत पडली त्याला |
भ्रांत, लुटविली दौलत कसबिणीला |
<<< |
कोण पुसेना त्या, राव-कंचनिला |
नित करीती गायनकला या नाटकशाळा |
मेण्यांमध्ये बसवून आणती त्यांला, |
ये आयने महाल त्याच्या राव बैठकीला ... " |
परंतु या शाहिरांच्या पोवाड़ा 'कथना' वर विश्वास कितपत ठेवायचा हाच सर्वात मोठा प्रश्न |
आहे. जसे बाळाजीपंत नातू होता तसेच हे शाहीरदेखील एलफिन्स्टनने फेकलेले चार तुकडे |
चघळत बाजीरावांच्या विरोधात बोलत नसतील कशावरून? शाहिराची लोकप्रियता अन् |
जनमानसात त्यांची सहज एकरूप होण्याची प्रवृत्ती यामुळे बाजीरावांच्या बाबतीत लोकांच्या |
मनात विष पेरण्याकरता एलफिन्स्टननेच या शाहिरांना फितूर केले नसेल हे कशावरून |
सांगता येईल? आणि जर शाहिरांवरच विश्वास ठेवायचा झाला तर मग दुसऱ्या बाजीरावांना |
अक्षरशः देवासमान मानणारे शाहीरही होतेच की ... शाहीर होनाजी शिलारखाने (होनाजी |
बाळा) म्हणतो- |
"दिन असता अंधार, आकाशतळी पडला बाई, |
विश्वतरंगाकार प्रभूवीण शून्य दिशा दाही |
निर्मळ शशीसारखी आचळ आहे पदरी पुण्याई |
तरीच भेटतील स्वामी येरव्ही नसे उपाय काही ... |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.