text
stringlengths 0
147
|
---|
सतराव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी अंगावर पडूनही नारायणरावांच्या मनात पोच |
निर्माण झाली नव्हती. वयाने ते अल्लडच राहिले होते. एका समकालीन पत्रात म्हटलं आहे |
की, "श्रीमंतांची मर्जी फारच उतावीळ आहे असे आहे. लहान माणसांची चाल पडलेसी |
दिसते. आपपर कळत नाही. कारभारी करतील ते प्रमाण. धन्यात धनीपण अजिबात |
नाही." वास्तविक नानासाहेबांनंतर पेशवेपद आपल्याला मिळावे अशी सुप्त |
इच्छा होती. परंतु माधवरावांच्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे रघुनाथरावांचे काही चालले |
नाही. परंतु माधवरावसाहेब गेल्यानंतर नारायणराव पेशवाई सांभाळण्यास योग्य नाहीत असे |
म्हणून त्यांनी पुन्हा कारस्थाने सुरू केली. सखारामबापूंसारख्या 'देशस्थाने'ही दादासाहेबांना |
साथ दिली. बापूंनी पहाऱ्यावरच्या गारद्यांना फितवले. गारद्यांच्या प्रमुखांना- सुमेरसिंगाला, |
महंमद इसाफ, खरकसिंग आणि बहादूरखान यांना तीन लक्ष रु. देण्याचे मान्य केले. बापूंनी |
'नारायणरावांस धरावे' अशा अर्थाचे पत्र करून, त्यावर रघुनाथरावांची स्वाक्षरी घेऊन ते |
गारद्यांना दिले. नारायणरावांची 'हत्या' झाली. या प्रसंगावरून अनेक तर्कवितर्क पुढे आले. |
पेशवाईला धनी म्हणून आपलाच पती त्या गादीवर बसावा असे म्हणून आनंदीबाईंनीच मूळ |
पत्रात 'ध'चा 'मा' केला असा गैरसमज पसरवण्यात आला. परंतु असत्य आहे. |
नारायणरावांच्या हत्येनंतर नानासाहेबांनी पकडलेल्या महंमद इसाफने जबानी दिली की, |
'नारायणरावांना मारावे असे कोणाचेच मत नव्हते. ते काम आयत्या वेळेस सुमेरसिंगाने |
केले.' त्यामुळे बखरकार आणि इतिहासकारांनी पुढे आनंदीबाईवर सर्व आरोप केले ते |
चुकीचे आहेत. आनंदीबाई या अत्यंत कडक परंतु शिस्तप्रिय अन् सुस्वभावी होत्या. |
नारायणरावांना धरण्याच्या (कदाचित मारण्याच्याही) मसलतीत फक्त रघुनाथरावांचाच हात |
असावा. कारण यानंतरच्या एका पत्रात म्हटलं आहे, "(मृत्यूचे) सुतक नाही. नित्य नमस्कार |
सूर्यास घालीतात. 'वैरियाचे सुतक कशास?' ऐसे म्हणतात ... ". यामुळेच नारायणराव |
पेशव्यांच्या खुनाच्या प्रकरणात आनंदीबाईंचा काही हात नसावा असे दिसून येते. स्वतःच्या |
सख्ख्या पुत्राचे (बाजीरावांचे) सर्व दोष जगासमोर मांडणाऱ्या, नारायणरावांच्या मृत्यूनंतर |
त्यांच्या गरोदर पत्नीला गारद्यांपासून वाचवणाऱ्या, त्यांच्या पुत्राला (सवाई माधवराव) 'सुख |
पडेल तेथे न्यावे' असे नाना फडणवीसांना खडसावणाऱ्या आनंदीबाईंना उगाचच आरोपीच्या |
पिंजऱ्यात उभे केले गेले. |
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या बाबतीत तर ते 'अस्सल भट कुलोत्पन्न' आहेत की |
नाहीत यावरूनच वाद उत्पन्न झाले होते. सवाई माधवरावांचा चेहरा हा नाना |
बराचसा मिळताजुळता होता. योगायोगाने गंगाबाई गरोदर असतानाच नाना |
पत्नीही गरोदर होती. बारभाईंच्या कारकीर्दीत नाना गंगाबाईंसोबत आपलेही |
कुटुंब पुरंदरावर नेले होते. सवाई माधवरावांच्याच जन्माच्या वेळी नानांनाही अपत्य झाले. |
पण ती कन्या होती. हे पाहून नानांच्या विरोधकांनी आणि रघुनाथरावांच्या समर्थकांनी असा |
अपप्रचार चालवला की, वास्तविक नारायणरावांना, म्हणजेच गंगाबाईंना 'कन्या' झाली |
असून नानांना 'पुत्र' झाला आणि केवळ पेशवाई चालवायची म्हणून नानांनी आपला पुत्र हा |
<<< |
नारायणरावांचा 'पुत्र' म्हणून गादीवर बसवला. तेव्हा या मुलाचा, म्हणजेच सवाई |
माधवरावांचा गादीवर काही हक्क नाही. परंतु या सर्व गोष्टींवर नानांनी मात केली आणि |
बाळ केवळ ४० दिवसांचं असताना त्याला पेशवाई मिळवून दिली. |
हे झालं अस्सल समकालीन वर्तमान. परंतु नंतरच्या काळात तर मात्र कहरच झाला. |
राज्य करण्याच्या हेतूने इंग्रज इतिहासकारांनी आणि एकंदरीतच ब्राह्मण अन् पेशवाईबद्दल |
आकस असणाऱ्या जातीयवादी लोकांनी असाही गैरसमज पसरवला की, नाना फडणवीस |
आणि गंगाबाई यांचे अनैतिक संबंध होते आणि सवाई माधवराव हा नाना |
गंगाबाईला झालेला अनौरस पुत्र आहे !! अन् याहूनही अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे बऱ्याच |
लोकांनी या गैरसमजुतीवर विश्वास ठेवला. |
रघुनाथराव पेशव्यांचे पुत्र बाजीराव (दुसरे) यांच्याबद्दल तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड राग |
आहे. परंतु, त्याबद्दलच अनेक गैरसमजही आहेत. अन् काही गैरसमज हे मुद्दाम पसरवण्यात |
आले आहेत. |
सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतरच्या राजकारणातून बाजीरावांना अचानक अनपेक्षितपणे |
पेशवाईची सूत्रे मिळाली. इतकी वर्षं कैद अन् एकदम अशी सत्ता हातात आल्यानंतर काय |
करायचं हे बाजीरावांना न समजल्याने सुरुवातीला त्यांच्या हातून अनेक गंभीर चुका घडल्या. |
नाना कैदेत टाकणे, दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्यावेळी मराठी सरदारांना मदत |
न करणे, इंग्रजांशी 'वसईचा तह' करणे या सर्व बाजीरावांच्या अत्यंत मोठ्या घोडचुकाच |
म्हणायला हव्यात. परंतु, इ. स. १८११ मध्ये पुण्याचा रेसिडेंट म्हणून कर्नल बॅरी क्लोज |
याच्या जागेवर जेव्हा माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन या शिस्तप्रिय इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक |
झाली तेव्हा मात्र बाजीरावांनाही 'कंपनी सरकार'चा खरा हेतू आणि आपण केलेल्या चुकांची |
जाणीव होऊ लागली. परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला होता. एलफिन्स्टन हा अत्यंत धूर्त |
गृहस्थ होता. त्याचं हेरखातं जबरदस्त होतं. बाजीराव पेशवे जेवायला बसण्यापूर्वीच त्यांच्या |
ताटात काय पदार्थ असणार आहेत याची त्याला कल्पना येत असे. बाजीरावांनाही ही गोष्ट |
कळून चुकली होती. आपण एलफिन्स्टनच्या जाळ्यात पुरते आहोत अन् आता |
यातून बाहेर पडण्यासाठी अत्यंत सावधपणे अन् नाजूक हातांनी जाळं तोडायला पाहिजे |
हे त्यांना पक्क समजून चुकलं होतं. म्हणूनच बाजीराव दरवेळेस एलफिन्स्टनसमोर 'आपण |
खूप मृदू स्वभावाचे, युद्ध-लढाईऐवजी ख्यालीखुशालीत रमणारे आहोत. मोहिमांचा |
आपल्याला खूप तिटकारा आहे. तोफांचा आणि बंदुकांचा नुसता आवाजही आपल्याला |
सहन होत नाही' असे बहाणे करत असत. परंतु, याच बरोबरीने इंग्रजांचे मूळ कायमचे |
उखडून टाकण्याची तयारीदेखील सुरू होतीच. म्हणूनच बाजीरावांनी सदाशिव |
माणकेश्वरांच्या फितुरीचे निमित्त करून त्यांचा कारभारी म्हणून त्रिंबकजी डेंगळे या |
जबरदस्त असामीला नेमले. त्रिंबकजी डेंगळे म्हणजे दुसरे नाना फडणवीसच होते. नानांची |
शिस्त, कारभारावरची मजबूत पकड, शत्रुंविषयीचे योग्य ते धोरण, परकीय |
गोऱ्यांविषयीची शंका इ. साऱ्या गोष्टी त्रिंबकजींमध्ये जशाच्या तशा होत्या. आपण स्वतः फार |
कर्तबगार नाही आहोत हे स्वतःला समजल्यामुळेच बाजीरावांनी सर्व कारभाराची मुखत्यारी |
<<< |
त्रिंबकजींना दिली होती. नेमकी हीच गोष्ट बाजीरावांच्या भवतीच्या लोकांना खटकू लागली |
आणि त्यातूनच 'बाजीराव हा भित्रा आहे. तो पूर्णपणे त्याचा खुषमस्कऱ्या त्रिंबकजी |
डेंगळ्यांच्या कह्यात गेला आहे' अशा अफवा उठू लागल्या. |
त्रिंबकजी डेंगळ्यांनी बापू गोखले, आबाजीपंत पुरंदरे, गणपतराव पानसे अशा शूर |
सरदारांना एकत्र करून गुप्तपणे इंग्रजांविरुद्ध कारवाई करण्याची तयारी सुरू केली. नेमकं |
हेच एलफिन्स्टनला जाऊ लागलं. कसंही करून त्रिंबकजींना कारभारातून हटवणं |
गरजेचं होतं. नेमकं याच वेळेस गंगाधरशास्त्र्यांचं प्रकरण उद्भवलं. एलफिन्स्टनने गोविंदराव |
बंधुजी या माणसामार्फत पंढरपुराण शास्त्रयांचा खून करवला आणि त्याबद्दल त्रिंबकजीला |
दोषी ठरवून कैद केलं. पुढे त्रिंबकजी डेंगळे कैदेतून निसटले, परंतु बाजीरावांना मात्र त्यांच्या |
जिवाखातर 'पुणे करार' करावा लागला. |
१८१७-१८ च्या तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मात्र बाजीराव पेशवे स्वतः हाती शस्त्र |
घेऊन इंग्रजांविरुद्ध मैदानात उतरले असता, बाकीच्या सरदारांनी मात्र ऐनवेळी पेशव्यांचा |
घात केला. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले हे ऐनवेळी वतन हवे म्हणून अडून बसले. |
नागपूरकर भोसल्यांना 'सेनासाहेब सुभा' हे पद हवे होते. ग्वाल्हेरच्या शिंद्यांना |
'अलिजाबहाद्दर' अशी पदवी हवी होती. शिदोजीराव नाईक निंबाळकर उर्फ निपाणकर |
देसाई, घोरपडे, रास्ते असे अनेक सरदारही इंग्रजांना सामिल झाले. गोखले, पानसे, दीक्षित हे |
लोक रणांगणात पडले आणि बाजीरावांच्या शरणागतीपर्यंत केवळ त्रिंबकजी डेंगळे, |
विठ्ठलराव विंचूरकर आणि आबा पुरंदरे हे तीनच सरदार पेशव्यांच्या पाठी सावलीसारखे उभे |
होते. |
पेशवाई बुडाल्यानंतर जनमानसात दुसऱ्या बाजीरावांविषयी अन् त्रिंबकजी |
डेंगळ्यांविषयी प्रचंड चीड अन् राग होता. तो असणं स्वाभाविक होतं. कारण थोरल्या |
शिवछत्रपतींनी पाया घातलेलं आणि थोरल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी कळसाला नेलेलं |
मराठी राज्य, धरणीकंपात एखादी कोसळावी तसं कोसळलं होतं. परंतु मराठी राज्य |
बुडण्याचा दोष फक्त बाजीरावांनाच देणं हे कितपत योग्य आहे याचा विचार मात्र दुर्दैवाने |
कोणीही केला नाही. ललित लेखक आणि इतिहासाचे जाणकार असलेल्या श्री. ना. सं. |
इनामदार यांनी या गोष्टीचं अत्यंत योग्य अन् मोजक्या शब्दात विवेचन केलं आहे- ('झेप'- |
प्रस्तावना (ले. ना. सं. इनामदार)) " ... मराठ्यांपासून राज्य हिसकावून घेताना आमचे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.