audio
audioduration (s) 2.36
25.8
| text
stringlengths 18
172
| gender
class label 2
classes |
---|---|---|
गुरु पहाटे उठले, त्या वेळी अर्ध्या छपरातून चंद्र दिसत होता. | 0female
|
|
त्यांनी कविता लिहिली, त्या कवितेत होते, देवा, आम्हाला आधीच ज्ञात असते, तर आम्ही आधी अर्धेच छप्पर बांधले असते. | 0female
|
|
आता आम्ही झोपतांना चंद्रही बघू शकतो. | 0female
|
|
बक-यांच्या एका कळपावर एका वाघिणीने झेप घेतली. | 0female
|
|
वाघीण गरोदर होती, उडी मारता मारताच ती व्यायली आणि थोड्याच वेळाने मरण पावली. | 0female
|
|
तिचे पिल्लू त्या बक-यांच्या कळपात वाढू लागले, बकऱ्यांसह तेही पालापाचोळा खाऊ लागले. | 0female
|
|
बकऱ्या बें बें करीत, तसेच तेही बें बें करू लागले. | 0female
|
|
हळूहळू ते पिल्लू बरेच मोठे झाले. | 0female
|
|
एक दिवस त्या बकऱ्यांच्या कळपावर एका वाघाने आक्रमण केले. | 0female
|
|
कळपातील गवत खाणाऱ्या वाघाला पाहून तो रानातील वाघ आश्चर्यचकित झाला. | 0female
|
|
धावत जाऊन त्याने त्या गवत खाणाऱ्या वाघाला पकडले, तो बे-बें करून ओरडू लागला. | 0female
|
|
रानातल्या वाघाने त्याला ओरडत फरफटत तलावापाशी नेले. | 0female
|
|
मग तो त्याला म्हणाला, पहा, जरा पाण्यात आपले प्रतिबिंब पहा, पाण्यात तुझे तोंड दिसते आहे. | 0female
|
|
नीट पहा, तू अगदी माझ्यासारखा दिसत आहेस आणि हे घे थोडेसे मांस खा. | 0female
|
|
असे म्हणून रानातल्या वाघाने त्याच्या तोंडात बळेबळे मांस कोंबले. | 0female
|
|
आधी तो गवत्या वाघ मांस खायला सिद्ध होईना. | 0female
|
|
तो एक सारखे बें बें करून ओरडत होता. | 0female
|
|
थोडीशी रक्ताची चटक लागताच तो ते मांस आनंदाने खाऊ लागला. | 0female
|
|
तेव्हा रानातला वाघ म्हणाला, कळले ना आता, अरे, जो मी आहे तोच तू आहेस, चल आता माझ्यासह वनात. | 0female
|
|
एक राजा आणि शेठजी यांची गाढ मैत्री होती. | 0female
|
|
शेठजी चंदनाच्या लाकडांचा व्यापारी होता. | 0female
|
|
चार पाच वर्षे त्याच्या लाकडाची विक्री झालीच नाही. | 0female
|
|
त्याला असे वाटले की, हे लाकूड मूल्यवान आहे, हे लाकूड कोण विकत घेईल ? | 0female
|
|
हे केवळ राजाच विकत घेऊ शकतो. | 0female
|
|
शेठजीला असे वाटले की, राजा जर मेला, तर त्याला जाळण्याकरता चंदनाच्या लाकडांची आवश्यकता लागेल. | 0female
|
|
त्यामुळे माझा व्यापार चांगला होईल. | 0female
|
|
इकडे राजाच्या मनात शेठजींच्या विषयी कुभाव उत्पन्न झाला की, हा शेठजी निपुत्रिक आहे. | 0female
|
|
जर हा मेला, तर याचे धन राज्य भांडारात जमा होईल. | 0female
|
|
दोघांच्याही मनात असे कुविचार येऊन गेले. | 0female
|
|
जेव्हा ते भेटले, तेव्हा त्यांनी एकमेकांना आपापल्या मनातील विचार सांगितले. | 0female
|
|
राजाच्या मनात असे विचार यायचे कारण काय? | 0female
|
|
शेठजींच्या मनात राजाविषयी वाईट विचार आला; म्हणून राजाच्या मनात त्याची प्रतिक्रिया उमटली. | 0female
|
|
राजाने शेठजींची कान उघडणी केली की, वाईट विचारांपेक्षा मनात चांगले विचार आणावे. | 0female
|
|
राजाने आपल्या महालाचे दरवाजे चंदनाचे करावे आणि माझे सर्व चंदन विकले जावे. | 0female
|
|
एकदा एक पिता-पुत्र एका घोड्याला घेऊन जात होते. | 0female
|
|
मुलाने वडिलांना सांगितले, तुम्ही घोड्यावर बसा, मी पायी चालतो. | 0female
|
|
वडील घोड्यावर बसले, रस्त्याने जात असता लोक म्हणू लागले, बाप निर्दयी आहे. | 0female
|
|
लहान मुलाला उन्हातून चालवतो आणि आपण मात्र आरामात घोड्यावर बसला आहे. | 0female
|
|
हे ऐकून वडिलांनी मुलाला घोड्यावर बसवले आणि आपण पायी चालू लागले. | 0female
|
|
पुढे भेटलेल्या लोकांनी म्हटले, मुलगा किती निर्लज्ज आहे पहा! | 0female
|
|
आपण तरुण धडधाकट असूनही घोड्यावर बसला आहे आणि बापाला पायी चालवतो आहे! | 0female
|
|
हे ऐकून दोघेही घोड्यावर बसले. | 0female
|
|
पुढे गेल्यावर लोक म्हणाले, हे दोघेही म्हसोबासारखे आहेत आणि छोट्याशा घोड्यावर बसले आहेत. | 0female
|
|
बिचारा यांच्या वजनाने दबून जाईल. | 0female
|
|
हे ऐकून दोघेही पायी चालू लागले. | 0female
|
|
काही अंतरावर गेल्यानंतर लोकांचे बोलणे ऐकू आले, किती मूर्ख आहेत हे लोक ? | 0female
|
|
बरोबर घोडा आहे, तरीही आपले पायीच चालले आहेत. | 0female
|
|
काही केले तरी लोक टीका करतात. | 0female
|
|
लोकांना काय आवडेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा भगवंताला आपण काय केलेले आवडेल, इकडे लक्ष द्या. | 0female
|
|
सगळ्या जगाला प्रसन्न करणे कठीण आहे, भगवंताला प्रसन्न करणे सोपे आहे. | 0female
|
|
कंबन हा तामिळनाडूमधील महाकवी होता. | 0female
|
|
तो प्रतिभावान आणि सूक्ष्मदर्शी विद्वानही होता. | 0female
|
|
त्याला ओटूक्कूत्तन नावाचा मित्र होता, तोही मोठा विद्वान होता. | 0female
|
|
कंबन रामायण रचतो आहे, हे समजल्यावर कूत्तनलाही स्फूर्ती आली. | 0female
|
|
त्यानेही तामिळमध्येच रामायण रचनेला प्रारंभ केला. | 0female
|
|
दोघांचीही रामायणे स्वतंत्रपणे चालू झाली आणि यथावकाश ती पूर्णही झाली. | 0female
|
|
कंबनचे रामायण लोकप्रिय झाले. | 0female
|
|
कंबन आपले रामायण गायला लागला की, श्रोते तल्लीन व्हायचे आणि वाहवा करायचे. | 0female
|
|
कंबन जाईल तेथे त्याचा आदर व्हायचा, सन्मान मिळायचा, सगळीकडे त्याचाच जयजयकार होता. | 0female
|
|
कूत्तन आपले रामायण गायला बसला की, श्रोते नगण्यच असायचे, त्यामुळे कूत्तन हिरमुसला व्हायचा. | 0female
|
|
त्याला आपले सारे श्रम वाया गेले, असे वाटायचे. | 0female
|
|
आपण उपेक्षित अवस्थेत जगणार अन् शेवटी मरणार, असा विचार करता करता त्याचे डोके सैरभैर झाले. | 0female
|
|
त्याच्या जीवनात सर्वत्र निराशेचा अंधार पसरला. | 0female
|
|
एके दिवशी कूत्तनने, स्वतःच रचलेले रामायण जाळून, त्या रामायणाची राख अंगाला फासून, गोसावी बनण्याचे ठरवले. | 0female
|
|
ही वाईट बातमी कंबनच्या कानी गेली, तो धावतपळत मित्राकडे पोहोचला. | 0female
|
|
त्याने पाहिले, तेव्हा कूत्तन, स्वतःच्या रचलेल्या रामायणाच्या पोथीचा, स्वाहाकार करत होता. | 0female
|
|
कंबन म्हणाला अरे वेड्या, हा काय प्रकार चालवला आहेस ? | 0female
|
|
स्वतः रचलेले रामायण असे का जाळत आहेस? | 0female
|
|
त्यावर कूत्तन म्हणाला, तुझ्यापुढे मी काजवा आहे. | 0female
|
|
माझ्या रामायणाला कोणीही विचारणार नाही, ते धूळ खात पडेल, त्यापेक्षा ते जाळलेले बरे ! | 0female
|
|
कंबनने कूत्तनचा हात पकडला, तेव्हा कूत्तनच्या रामायणातील उत्तरकांड तेवढे जाळायचे राहिले होते. | 0female
|
|
कंबनने ते स्वतःकडे घेतले, कंबन कूत्तनला म्हणाला, वेड्या, तू माझा मित्र ना! | 0female
|
|
हा स्वाहाकार करायच्या आधी मला बोलायचेस तरी ! | 0female
|
|
आता मी सांगतो ते ऐक, तुझे रामायण लिहून पूर्ण झाले आहे. | 0female
|
|
माझ्या रामायणाचे उत्तरकांड अजून रचायचे आहे, ते मी आता रचणार नाही. | 0female
|
|
माझ्या रामायणाला तुझे हे उत्तरकांड जोडीन, म्हणजे रामायण पूर्ण होईल. | 0female
|
|
लोक तुला आणि मला रामायणकर्ते म्हणून ओळखतील ! | 0female
|
|
मित्रप्रेमाचा हा एक आदर्श ठरेल !! | 0female
|
|
शूरसेन नावाचा एक राजा होता. | 0female
|
|
त्याने आपले राज्य पुष्कळ वाढवले, त्याची प्रजाही सुखी होती. | 0female
|
|
राजाला आपले शौर्य, राज्य, ऐश्वर्य आणि कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा अभिमान होता. | 0female
|
|
त्याला अध्यात्म शिकण्याची इच्छा झाली, तेव्हा शूरसेनाने आपल्या प्रधानाला बोलावले. | 0female
|
|
राज्यातील सर्वश्रेष्ठ अध्यात्मातील अधिकारी असलेल्या गुरूंचा मानसन्मान करण्यास सांगितले. | 0female
|
|
अध्यात्म शिकवण्यासाठी त्यांना प्रतिदिन राजवाड्यात घेऊन येण्यास सांगितले. | 0female
|
|
आपल्या राजधानीच्या जवळच रानामध्ये एका झोपडीत आत्मानंद महाराज राहतात. | 0female
|
|
त्यांना साक्षात्कार झालेला आहे; पण ते येथे राजवाड्यात येतील, असे वाटत नाही. | 0female
|
|
तू रथ घेऊन जा, त्यांचा मानसन्मान कर आणि कसेही करून त्यांना घेऊन ये. | 0female
|
|
प्रधान आत्मानंद महाराजांकडे गेला. | 0female
|
|
त्यांच्या पाया पडला आणि राजाचा निरोप सांगितला. | 0female
|
|
हे पहा, मला राजवाड्याची आवश्यकता नाही. | 0female
|
|
राजाला अध्यात्म शिकायचे आहे, तर आवश्यकता राजाला आहे. | 0female
|
|
त्याला खरीच तळमळ असेल, तर त्याने माझ्या झोपडीत शिकायला यावे. | 0female
|
|
प्रधानाने राजास त्याप्रमाणे कळवले. | 0female
|
|
शेवटी राजा अध्यात्म शिकण्यासाठी आत्मानंदांच्या झोपडीत यायला सिद्ध झाला. | 0female
|
|
राजा झोपडीत आला, त्या वेळी झोपडीतील एका बाजूच्या खोलीत आत्मानंद महाराज बसलेले होते. | 0female
|
|
राजाने प्रधानासमवेत, मी आलो आहे, असा महाराजांना निरोप पाठवला. | 0female
|
|
त्यालावाटले, महाराज त्याच्या स्वागताला बाहेर येतील. | 0female
|
|
आत्मानंद महाराजांनी प्रधानाला सांगितले, राजांना घेऊन आपण माझ्या खोलीत या. | 0female
|
|
खोलीचे दार केवळ ४ फूट उंचीचे होते. | 0female
|
|
राजा आणि प्रधान यांना वाकून खोलीत यावे लागले. | 0female
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.